चला करूया ज्ञानरचनावादाचा स्वीकार…

चला करूया ज्ञानावादाचा स्वीकार…

Natural-way-of-Education


  मार्गदर्शक:मा.शौकत पठाण साहेब (गटशिक्षणाधिकारी सोनपेठ,परभणी )                                                                         

    ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?

           

पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना-निर्मिती करणे, म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानरचनावाद ही शिक्षणशास्त्रातील नव-संकल्पना असून ती एक अध्ययनाचे तत्त्वज्ञान आहे. ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परावर्तनामध्ये होते. यानुसार विद्यार्थी स्वत:चे ज्ञान स्वत: संरचित करतात. 

  1. ज्ञानरचनावाद
    विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो रचना करतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणाला अनुभव येतो.
    या पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना आपले ज्ञान देण्यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात.
  2. रचनावाद हा विद्यार्थ्यांना निष्क्रिय माहिती ग्रहण करणारा न बनवता सक्रिय सहभागी बनवत आहे.
  3. पाठ्यपुस्तक अथवा शिक्षकाकडून यांत्रिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा शिक्षकाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी स्वतः ज्ञानाची रचना करतो.
  4. रचनावादामध्ये शिक्षकांची भूमिका पोषक वातावरण तयार करणे हे आहे. म्हणजेच ज्ञानाचा सुलभक होणे गरजेचे आहे.
  5. रचनावादामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन जो विद्यार्थी प्रत्येक कृतीमध्ये सहभाग होतो ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त आहे तो विद्यार्थी चांगला असे समजले जाते.
  6. विद्यार्थी,शिक्षक,शैक्षणिक साहित्य यांच्यासोबत आंतरक्रिया झाली पाहिजे.
  7. रचनावाद हा विद्यार्थी केंद्रित आहे.
  • वर्तनवाद
    वर्तनामध्ये झालेला बदल म्हणजेच वर्तन वाद.
    शिकवायचे कसे यावर भर दिला जातो.
    वर्तनवाद हा शिक्षक केंद्रित प्रक्रिया आहे.
    वर्तनवादामध्ये ज्ञानाची निर्मिती ही महान लोक शास्त्रज्ञ हे ज्ञानाची निर्मिती करतात. आपण फक्त त्यांना फॉलो करायचं त्यांची ज्ञान आत्मसात करायचे असा समज असतो. यामध्ये त्यांनी तयार केलेली माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
  • शिक्षकांची भूमिका वितरकाची भूमिका असते.
  • परीक्षा रूपाने शिक्षकांनी दिलेली माहिती पेपर मध्ये उतरवणे जो विद्यार्थी जास्त माहिती पेपर मध्ये उतरविल तो विद्यार्थी हुशार असे समजले जाते.
    ज्या विद्यार्थ्यांची मेमरी स्ट्रॉंग असते तो विद्यार्थी हुशार समजला जातो.
ज्ञानरचनावादी पद्धतीचाच वापर का करावा

आपल्या मुलाची बुद्धिमत्ता बहुआयामी,अष्टावधानी ,अष्टपैलू बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी,अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी एक पालक,एक शिक्षक म्हणून काय केले पाहिजे की ज्यामुळे बुद्धिमत्ता विकसित होण्याचा speed  जास्त होऊ शकतो.neurons are the key players in the brain.  विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी neurons च्या  जोडण्या जास्त होणे गरजेचे आहे जितक्या जास्त neurons जोडण्या  होतील त्यातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता विकसित होते जास्त neurons जोडण्या करण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अनुभव देणे गरजेचे आहे. जे अनुभव, ज्या अनुभवामध्ये विद्यार्थी स्वतः सहभागी असला पाहिजे ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः सहभागी होतो, स्वतः अनुभव घेतो त्यातून जास्तीत जास्त neurons जोडण्या होतात जितक्या जास्त neurons  जोडण्या तितकी जास्त बुद्धिमत्ता विकसित व्हायला मदत होते. म्हणून आपण ज्ञानरचनावादी ही पद्धती स्वीकारली पाहिजे. 

           संकलन:श्री. बिरादार शशिकांत लिंबराज (सोनपेठ,परभणी )

 

2 Comments.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *